निळ्याशार समुद्रात बिकिनीमध्ये जान्हवी कपूरने जिंकली चाहत्यांची मने, गळ्यातील नेकलेसने वेधले सर्वांचे लक्ष
निळ्याशार समुद्रात बिकिनीमध्ये जान्हवी कपूरने जिंकली चाहत्यांची मने, गळ्यातील नेकलेसने वेधले सर्वांचे लक्ष
निळ्याशार समुद्रात बिकिनीमध्ये जान्हवी कपूरने जिंकली चाहत्यांची मने, गळ्यातील नेकलेसने वेधले सर्वांचे लक्ष
स्टार किड्स म्हणून सोनेरी जगतात पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरने काही वर्षातच स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. फक्त श्रीदेवीची मुलगी ही ओळख न ठेवता तिने अभिनयाच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना आकर्षित करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून…
View On WordPress
0 notes
ऋषी सुनक ब्रिटीश पीएम रेसमध्ये नवीनतम फेरीत अव्वल, स्पर्धा तीनपर्यंत खाली
ऋषी सुनक ब्रिटीश पीएम रेसमध्ये नवीनतम फेरीत अव्वल, स्पर्धा तीनपर्यंत खाली
ऋषी सुनकने सोमवारच्या ११५ वरून त्यांची संख्या वाढवली.
लंडन:
ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी कंझर्व्हेटिव्ह खासदारांच्या ताज्या मतांमध्ये पुन्हा आघाडी घेतली, कारण शर्यतीत तीन स्पर्धकांना सोडून दुसरा उमेदवार बाहेर पडला.
सुनक यांना 118 मते मिळाली, त्यानंतर माजी संरक्षण मंत्री पेनी मॉर्डॉंट 92 आणि परराष्ट्र सचिव लिझ ट्रस 86 मते, लॉंगशॉट उमेदवार केमी बॅडेनोक 59 वर…
View On WordPress
0 notes
अंकिता लोखंडे विकी जैन त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्याबद्दल नवीन सुरुवातीसाठी चीअर्स
अंकिता लोखंडे विकी जैन त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाल्याबद्दल नवीन सुरुवातीसाठी चीअर्स
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे सध्या त्यांच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहेत. दोघांनी अलीकडेच ‘स्मार्ट जोडी’मध्ये एकत्र सहभाग घेतला आणि शो जिंकला. याशिवाय दोघेही अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करतानाही दिसतात. त्याच वेळी, नुकतीच अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि सांगितले आहे की तिने एक नवीन टप्पा सुरू केला…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज कामकाज सुरू होण्यापूर्वी विधिमंडळ परिसरात विरोधकांनी कापसाची माळ घालून राज्य सरकार विरोधात निदर्शनं तसंच घोषणाबाजी केली. कापसाला हमीभाव, कांद्याबाबतचं धोरण, तसंच विकासाच्या नावाखाली सरकारनं राज्यातल्या जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेध व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सही, शिक्क्याप्रकरणी राज्य शासनानं गंभीर दखल ��ेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरु असून कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत म्हटलं आहे.
****
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा या बैठकीचे अध्यक्ष असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर अनेक नेते या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश उमेदवारांची नावं जाहीर केली जातील.
****
माजी पंतप्रधान तथा स्वातंत्र्यसैनिक दिवंगत मोरारजी देसाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिवंगत मोरारजी देसाई भारतीय राजकारणातील प्रमुख नेते होते आणि एकता तसंच साधेपणाचे ते प्रकाशस्तंभ होते. त्यांनी राष्ट्राची अत्यंत समर्पित भावनेनं सेवा केली, असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावर सामाईक केलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
निवडणुकीत युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी देशभरातल्या विविध उच्चशिक्षण संस्थांमध्ये 'मेरा पहेला वोट देश के लिये' हे मतदार जागरुकता अभियान राबवण्यास प्रारंभ झाला आहे. मतदान करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करणं तसंच मतदानाचं महत्व युवकांना पटवून देणं हा या अभियानाचा उद्देश आहे. येत्या ६ मार्चपर्यंत चालणारं हे अभियान प्रत्येक विद्यापीठात घेण्यात यावं, असं देशभरातल्या सर्व विद्यापीठांना पत्राद्वारे सांगण्यात आल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी आकाशवाणीला दिली आहे. युवकांमध्ये मतदानासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठी वेबिनार आणि सेमिनार आयोजित करावेत, असं ही विद्यापिठांना सूचित करण्यात आल्याचं ते म्हणाले.
****
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नागरी भागातील पात्र शाळांना परसबाग निर्मिती, परसबागेतून उत्पादीत भाजीपाला यांचा पोषण आहारात समावेश, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगरसह मुंबई, पुणे आणि नाशिक विभागांसाठी विठ्ठल कामत यांच्या अध्यक्षतेखाली तर अमरावती आणि नागपूर विभागासाठी पाककला तज्ज्ञ विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या कार्य करतील. नागरी भागातील शाळांमध्ये परसबागा निर्मिती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या भाजीपाल्याची लागवड करणं तसंच भाजीपाल्याचा विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये समावेश करणं आणि शिल्लक राहणाऱ्या आहाराबाबत उपाययोजना आदींबाबत या समित्या मार्गदर्शन करणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात लग्नघरी हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून २०० जणांना विषबाधा झाली असून यात सात बालकांचाही समावेश आहे. अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा इथं काल ही घटना घडली. विषबाधेनंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, विषबाधा झालेल्या सर्व लोकांवर उपचार करण्यात येत आहेत.
****
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताची प्रमुख नेमबाज आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात नवीन जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तिनं आधीच्या विक्रमापेक्षा एका अंकानं वाढ नोंदवत ५९७ अंकांसह हा नवा विक्रम केला आणि भोपाळ इथं मध्यप्रदेश राज्य शुटींग अकादमी रेंजमध्ये आशी चौकसेनं ४६१ पूर्णांक ८ गुणांनी ही स्पर्धा जिंकली आहे. आशी सध्या महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजीशन स्पर्धेत राष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, या स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल स्पर्धेत अर्जून बाबुतानं २५२ पूर्णांक ५ गुण मिळवत पहिलं स्थान पटकावलं आहे.
****
0 notes
शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत - उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १३: “ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारे प्रतिभावंत व्यक्तिमत्व हरपले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनाने भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केलं. कोट्यवधी रसिकांची मन जिंकली.
ठुमरी,…
View On WordPress
0 notes
Madhuri Dixit माधुरी दीक्षितने या एका सीनसाठी घेतले होते 1 कोटी रुपये, इंडस्ट्रीत उडाली होती खळबळ
0 notes
सेमिफायनल मध्ये भाजपने सत्ता गाठली काँग्रेस एका जागी विजय
17-12-2023
अनुराधा पाटील
भाजपने मारली हॅट्रिक तर काँग्रेस एकाच जागी विजय.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला मागे टाकले जेथे दोघे आमने-सामने लढत होते, राजस्थान आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांवर नियंत्रण मिळवले आणि मध्य प्रदेशात सत्ता राखली. तेलंगनातील एक उल्लेखनीय पुणरुजजीवन ज्याने भाजपला तिसऱ्या क्रमांकावर ढकललं . हा काँग्रेस साठी एकमेव दिलासा होता.काँग्रेस ने पाच वर्षांपूर्वी तिन्ही राज्य जिंकली होती, तरीही मध्यप्रदेशशात राजकीयदृष्ट्या संधीसाधू पक्षा मुळे मध्यप्रदेश गमावला होता. बाजप ने राज्यस्थान मध्ये 115 मध्यप्रदेश 163 तर छत्तीसगड मध्ये 54 जागणी हॅट्रिक मारली.लाडली बेहना योजने मुळेच भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला.तर भाजप चा प्रचार देखील नरेंद्र मोदींनी केला.
छत्तीसगड मध्ये ही मोदींनी 7 रेली काढल्या आणि प्रचार केला. तेलणंगणा मध्ये काँग्रेस ने बऱ्यापैकी जम बसवला.तर राज्यस्थान मध्ये योगीजींनी कमान सांभाळली. आणि बाळाकनाथ आणि दियाकुमारी यांसारखे मोठे चेहरे मुख्यमंत्री पदा साठी उभा केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ७, १७,२३ आणि ३० नोव्हेंबरला या पाचही राज्यांमध्ये मतदान पार पडेल. त्यानंतर ३ डिसेंबरला या पाचही राज्यांमध्ये एकाचवेळी मतमोजणी केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. २३ नोव्हेंबरला राजस्थानमधील मतदार राजकीय नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील.
1 note
·
View note
राष्ट्रपती पदकाचे मानकरी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जयंत नाईकनवरे जसे दिसले तसे.
लातूरला मिशन आयएएसच्या कार्यक्रमासाठी आलो होतो . १५ ऑगस्टला सकाळी सकाळी वर्तमानपत्र हाती आले आणि त्यात अतिशय आनंदाची बातमी वाचली .ती म्हणजे अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय श्री जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याची .खरोखरच खूप आनंद झाला. तो यासाठी की जयंत नाईकनवरेसाहेब हे माझे जवळचे मित्र आहेत. आणि खऱ्या अर्थानं ते एक कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महा निरीक्षक आहेत. एक संवेदनशील मनाचा कर्तव्य तत्पर आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा परोपकाराची भावना मनामध्ये बाळगणारा आणि मी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे हे विसरून लोकांमध्ये मिसळणारा पोलीस अधिकारी म्हणून मी जयंत नाईक नवरे साहेबांचा उल्लेख करेन.
सर अमरावतीला रुजू झाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मध्यंतरी श्री संत गाडगेबाबा यांचे वाहन चालक श्री भाऊराव काळे पाटील माझ्याकडे आले .मी साहेबांना सूचना दिली. साहेब म्हणाले मला त्यांना भेटायचं आहे .त्य��प्रमाणे आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांनी हृदयापासून त्यांचे स्वागत केले . संत गाडगे महाराज यांच्या आठवणी त्यांच्याकडून समजून घेतल्या आणि प्रत्यक्ष गाडगे महाराजांना आपण जरी भेटू शकलो नाही तरी त्यांचे चालक म्हणून काम करणारे श्री भाऊराव काळे यांना भेटू शकलो त्याबद्दल श्री नाईकनवरे साहेबांनी खूप आनंद व्यक्त केला .
दरवर्षी आमचे मे जून महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर असते. या शिबिराला संपूर्ण महाराष्ट्रातून मुले येतात. मी सरांना शिबिराचे निमंत्रण दिले .सरांनी ते स्वीकारले. मी म्हटलं सर मी कोणाला तरी घ्यायला पाठवतो. ते म्हणाले त्याची गरज नाही. मी बरोबर वेळेवर येईल. सरांनी शिबिरासाठी वेळ दिली ती देखील सायंकाळी सहानंतर . म्हणजे आपले कार्यालयीन कामकाज ऑटोपल्यानंतर. साहेब आमच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये आले आणि मुलांमध्ये इतकी मिसळून गेले आणि पोरांनाही त्यांचे भाषण त्यांचे अनुभव इतके जवळचे वाटले की दोन तास कसे निघून गेले ते कळले नाही..
आम्ही अमरावतीच्या शारदा विद्यालयांमध्ये व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये मिशन आयएएस अंतर्गत अधिकारी आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमात अधिकारी त्या शाळेमध्ये जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्या अंतर्गत मी साहेबांना निमंत्रण दिले. साहेबांनी ते हसतमुखाने स्वीकारले. आणि येण्याचे मान्य केले .मी परत सरांना म्हटलं की तुम्हाला घ्यायला कोणाला तरी पाठवतो. सरांनी स्पष्टपणे नकार दिला .ते म्हणाले आम्ही शोधून घेऊ .सर त्याप्रमाणे आले .शारदा विद्यालयातील व शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मुलांना इतके प्रेरित केले की जवळपास 20 मुलांनी सरांना प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाला सरांनी हसत खेळत उत्तर दिले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुलांनी सरांची गाडी पाहिली. सायरन कसा वाजतो ते प्रात्यक्षिक करून पाहिले .पोरांना खूप कुतुहूल असते. पोलिसांबद्दल भीती असते .पण नाईकनवरेसरांनी पोरांमध्ये मिसळून आपल्या गाडीची तोंड ओळख त्यांना करून देऊन पोलिसांचा सायरन कसा वाजते त्याचे प्रॅक्टिकल करून मुलांची मने जिंकली .
अशाच एक वेळ मला सरांचा फोन आला. ते म्हणाले काठोळे सर तुम्ही घरी आहात काय ? ते म्हणाले मला तुम्हाला काही पुस्तके भेट द्यावयाची आहेत. त्यांनी दोन बॉक्स भरून पुस्तके मला सप्रेम भेट दिली. त्यानंतरही परत त्यांचा फोन आला. सर अजून काही पुस्तके शिल्लक आहेत. ती देखील मला तुम्हाला द्यावयाची आहेत. मित्रांनो पुस्तकाचे दान हे सगळ्यात महत्त्वाचे दान असते. आणि जयंत नाईकनवरे सरांनी पुस्तक लिहून नुसतं ते थांबले नाहीत .तर प्रत्यक्षात कृतीतून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती व्यक्त केलेली आहे .ही एक परोपकाराची प्रवृत्ती दर्शवून आपली भारतीय संस्कृती आपलीसी केलेली आहे.
सरांचे माझे फोनवर अधून मधून बोलले होते. आमचा दर रविवारचा जो साहित्य परिवाराचा गेट-टु -गेदर कार्यक्रम होतो. त्याबद्दल ही सरांनी आनंद व्यक्त केला आणि त्या कार्यक्रमातही मला यायचे आहे. साहित्यिक लोकांचा परिचय करून घ्यायचा आहे .असाही मनोदय व्यक्त केला. मी सतत प्रवासात असतो. परंतु आमचे अधून मधून सरांशी संपर्क सुरूच असतात. एक चांगला विशेष पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे सरांच्या रूपाने अमरावतीला मिळाला आहे .सरांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून हा महत्त्वाचा पल्ला गाठलेला आहे .आपल्या परिस्थितीचे वर्णन त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केले आहे. लेखनाचा छंद असलेला आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने चालणाऱ्या या माणसाचा गौरव राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपती पदक देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला .खरोखरच हे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचे झालेले मूल्यांकन आहे .मी अमरावतीकर नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो .आणि त्यांना शुभेच्छा देतो.
- प्रा. डॅा.नरेशचंद्र काठोळे
संचालक मिशन आयएएस अमरावती.
0 notes
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य!
मुंबई | राज्यात सत्तांतर होऊन आता नऊ महिने झाले. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पार पडलेला नाही. यावर आता आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
आमचे 20 मंत्री सक्षम आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गरज नाही. लोकांची तक्रार नाही. 20 मंत्र्यांमध्ये सुद्धा मंत्रिमंडळ चालू शकतं. हे या सरकारने (Goverment) दाखवून दिलं, असं बच्चू कडू म्हणालेत.
सभेने मत जिंकली जातात, असं नाही. सभा ही फक्त शक्ती प्रदर्शनासाठी असते. शक्ती प्रदर्शनासोबत कर्तव्याची जोड पाहिजे. तुमचं कर्तव्य जर नसेल तर सभेला काहीच किंमत नाही. काम बघून लोकं मत देतात सभा पाहून नाही. महविकास आघाडीचं कर्तृत्व शून्य आहे, अशी टीका बच्चू कडूंनी केलीये.
दरम्यान, शिंदे सरकार आल्यानंतर बच्चू कडू पुन्हा मंत���री होतील अशी चर्चा सुरू होती. मात्र दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार पार पडला नाही. यावरून बच्चू कडूंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
Read the full article
0 notes
Tanushree Dutta Birthday: from Pradip Madgaonkar
अवघ्या २०व्या वर्षी तनुश्री दत्ताने जिंकली होती ‘मिस इंडिया’ स्पर्धा; वाचा अभिनेत्रीबद्दल...
0 notes
England Beat Pakistan: इंग्लंड ठरला मुलतानचा सुलतान; पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकली
England Beat Pakistan: इंग्लंड ठरला मुलतानचा सुलतान; पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकली
England Beat Pakistan: इंग्लंड ठरला मुलतानचा सुलतान; पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकली
England Beat Pakistan, multan test highlights: मुलतान कसोटीतही पाकिस्तानचा पराभव झाला असून इंग्लंडने मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. इंग्लंडने पाकिस्तानला ३५५ धावांचे लक्ष्य दिले होते, ते पूर्ण करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला.
England Beat Pakistan, multan test highlights: मुलतान कसोटीतही पाकिस्तानचा पराभव…
View On WordPress
0 notes
Tanushree Dutta Birthday: from Bandya Mama
अवघ्या २०व्या वर्षी तनुश्री दत्ताने जिंकली होती ‘मिस इंडिया’ स्पर्धा; वाचा अभिनेत्रीबद्दल...
0 notes
रवी किशनच्या आईने कॅन्सरवर मात केली, अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आईचा फोटो आणि डॉक्टरांचे आभार मानले
रवी किशनच्या आईने कॅन्सरवर मात केली, अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केला आईचा फोटो आणि डॉक्टरांचे आभार मानले
रवी किशनची आई जदवती देवी यांनी कॅन्सरशी लढाई जिंकली: भोजपुरी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता रवि किशन हे वर्ष त्याच्यासाठी काही खास ठरले नाही. अभिनेत्याच्या मोठ्या भावाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्याच वेळी, अभिनेता बराच काळ त्याच्या आईबद्दल काळजीत होता. किंबहुना, त्याची आई दीर्घकाळ कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती. मात्र, रवी किशनने चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी शेअर केली…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 22 December 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर इथल्या हडको परिसरात पोहचली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी नागरीकांसोबत या यात्रेचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या कडे आली आहे, या योजना समजावून घ्या, लाभार्थी बना, असं आहवान कराड यांनी यावेळी केलं. नागरिकांनी विविध योजना जाणून घेण्यासाठी याठिकाणी गर्दी केल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेची प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली.
****
लातूर लोकसभा मतदारसंघात २०१९ पासून राबवलेल्या विविध शासकीय योजना तसंच सामाजिक प्रकल्पात केलेल्या कामांचा सविस्तर पुस्तकरूपी माहितीचा 'विकासपर्व' हा अहवाल, खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. या अहवालात लातूर लोकसभा मतदार संघात सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा आणि इतर अनेक विकास कामाबाबत माहितीचा ही समावेश असल्याचे श्रृंगारे यांनी सांगितलं. लातूर इथं होत असलेल्या रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनास येण्याबाबत पंतप्रधान मोदी यांना विनंती केल्याचंही श्रृंगारे यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत २०२३-२४ मध्ये बाजार भावाने तूर खरेदी करण्यासाठी पणन महासंघाच्या संस्थाकडून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. अर्धापूर, हदगाव, कासराळी, देगलूर इथल्या केंद्राना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात देखील तूर खरेदी करण्यासाठी सहा केंद्राना परवानगी दिली आहे. नाफेड प्रथमच बाजारभावात तूर खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांनी केलं आहे.
बीड जिल्ह्यात पाच केंद्रांना तूर खरेदी करण्याची परवानगी दिली असून, या केंद्रावर लातूरच्या बाजारभावात ९ हजार २०० ते ९ हजार ८०० रुपये प्रती क्विंटल तुरीची खरेदी केली जाणार आहे. परळी, घाटनांदुर, अंबाजोगाई, चौसाळा आणि माजलगाव इथल्या केंद्रांमध्ये तूर खरेदीसाठी शेतकर्यांना नोंदणी करता येणार आहे.
****
कोरोना विषाणूच्या नवीन जे एन - वन विषाणूच्या पार्श्वभ��मीवर नांदेड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला जात असल्याची माहिती, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. राज्य शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांचं पालन आरोग्य यंत्रणेकडून तसंच प्रशासनाकडूनही केलं जात आहे. जिल्ह्यात सध्या तरी कोणताही धोका नाही, मात्र नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकार्यांनी केलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, विधान परिषदेचे माजी आमदार आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचं आज नाशिक इथं अल्पशा आजारानं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. सोनवणे यांनी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून सलग दोन वेळा विजय मिळवला, त्यानंतर त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणुक जिंकली होती.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या लक्ष्मणनगर इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत काल शासकीय वाळू डेपोला प्रारंभ झाला. शासनाच्या नवीन वाळू धोरणावा एक भाग म्हणून हा डेपो सुरु करण्यात आला असून, या माध्यमातून सहाशे रुपये प्रति ब्रासप्रमाणे वाळू मिळणार आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर इथं काल खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि रामदास आठवले युवामंच संस्थेच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. नव्या भारताची नवीन खादीने आत्मनिर्भर भारत अभियानाला नवी दिशा दिली असून, गेल्या नऊ वर्षात खादी उत्पादनांच्या विक्रीत चार पटीने वाढ झाल्यानं, ग्रामीण भारतातले कारागीर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले असल्याचं कुमार यावेळी म्हणाले. ग्रामोद्योग विकास योजनेतंर्गत विविध जिल्ह्यातून आलेल्या १८० लाभार्थ्यांना मधुमक्षिका पालन पेटी, स्वयंचलित अगरबत्ती बनवण्याची मशीन तसंच विद्युत चलित चाकाचं वाटप यावेळी करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा एकशे आठवा भाग आहे. यावेळी फिट इंडिया या विषयावर भर दिला जाणार असून, या विषयावरील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्टार्ट अप्स याबाबत नागरीकांनी माहिती देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. नमो ॲपच्या हेल्दी मी. हेल्दी इंडिया या विभागामध्ये नागरीकांना त्यांचे अनुभव सांगता येतील.
****
0 notes
दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी
मुंबई, दि. 13 : सर…. तुमच्या मदतीमुळे आम्ही आजारांविरुद्धची लढाई जिंकली आहे… आता फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा… आमच्या जीवनातील लढाईवरही आम्ही मात करु….. अशीच काहीशी भावना त्या लहान मुलांच्या आणि त्यांच्या आई – वडिलांच्या डोळ्यातून व्यक्त होत होती… निमित्त होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या दिवाळी कार्यक्रमाचे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या…
View On WordPress
0 notes
औरंगाबाद देणार राज्याला नव्या २६१ ‘लाल परी’; पहिल्या बसचा मान नाशिकला
तब्बल तीन वर्षांनंतर तयार झालेल्या औरंगाबादेतील एसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील पहिली बस मिळविण्याची शर्यत नाशिक विभागाने जिंकली. ही पहिली बस मिळविण्यासाठी औरंगाबाद विभागाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. नव्या बससाठी औरंगाबादकरांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.
चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या तीन वर्षांपासून नवीन चेसीस नसल्याने नव्या बसगाड्यांची निर्मिती पूर्णपणे थांबलेली…
View On WordPress
0 notes