“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
भारतीय महिला संघाची धाकडं फलंदाज आणि यष्टीरक्षक रिचा घोष हिने आपल्या फलंदाजी कौशल्याने सर्वांनाच भुरली घातली आहे. महिला क्रिकेटमध्ये रिचाप्रमाणे धडाकेबाज फलंदाजी करणारे खेळाडू खूप आहेत. त्यामुळेच तिची ही फलंदाजीची शैलीच तिला इतर खेळाडूंपेक्षा वेगळं बनवते. सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत रिचाची…
View On WordPress
0 notes
1 note
·
View note
जयंत पाटलांचा दावा सपशेल खोटा, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यावरून भाजपा नेते अमित साटम यांचा पलटवार | BJP MLA amit satam on vedant foxconn project ncp leader jayant patil rmm 97
जयंत पाटलांचा दावा सपशेल खोटा, फॉक्सकॉन कंपनी गुजरातला नेण्यावरून भाजपा नेते अमित साटम यांचा पलटवार | BJP MLA amit satam on vedant foxconn project ncp leader jayant patil rmm 97
फॉक्सकॉन कंपनी गुजरातला जाणे हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. त्यांनी राज्य दिवाळखोर आणि वेळेवर वाटाघाटी करण्यास सक्षम नाही हे दर्शविले आणि आमच्याकडील तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या असा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी महाविकास आघाडीवर केला.
महाविकास आघाडी आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प…
View On WordPress
0 notes
' लई दमवलं ', पण नगर तोफखाना पोलिसांनी अखेर त्याला उचललेच
‘ लई दमवलं ‘, पण नगर तोफखाना पोलिसांनी अखेर त्याला उचललेच
दुचाकी गाड्यांच्या किमती देखील वाढल्यानंतर गाड्यांच्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. विशेष म्हणजे चोरी केलेल्या गाड्या ह्या खरेदी करणाऱ्यांचा देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर दोष आहे मात्र अशा गाड्या बहुतांश ग्रामीण भागात विकल्या जात असून अशाच एका गाडी चोरट्याला तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर तरुण हा अट्टल चोरटा असून त्याने आत्तापर्यंत नगर आणि बीड जिल्ह्यात विकलेल्या तब्बल 23 गाड्या…
View On WordPress
0 notes
' लई दमवलं ', पण नगर तोफखाना पोलिसांनी अखेर त्याला उचललेच
‘ लई दमवलं ‘, पण नगर तोफखाना पोलिसांनी अखेर त्याला उचललेच
दुचाकी गाड्यांच्या किमती देखील वाढल्यानंतर गाड्यांच्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. विशेष म्हणजे चोरी केलेल्या गाड्या ह्या खरेदी करणाऱ्यांचा देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर दोष आहे मात्र अशा गाड्या बहुतांश ग्रामीण भागात विकल्या जात असून अशाच एका गाडी चोरट्याला तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सदर तरुण हा अट्टल चोरटा असून त्याने आत्तापर्यंत नगर आणि बीड जिल्ह्यात विकलेल्या तब्बल 23 गाड्या…
View On WordPress
0 notes
Bandya च्या मित्रानं त्याच्या हाताच्या दहाच्या दहा बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या…
Bandya चकितच झाला! त्याला राहावलं नाही. त्यानं कारण विचारलं…
अरे बाबा, ही कुठली पद्धत दहा बोटांत अंगठ्या घालण्याची?
Pradip म्हणाला, एक अंगठी लग्नातली आहे आणि बाकीच्या ९ अंगठ्या लग्नानंतरच्या संकटाचं निवारण करण्यासाठी आहेत.
Bandya नं मित्राचे पाय धरले…
2 notes
·
View notes
दुसऱ्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीने केले ‘हे’ भयानक कृत्य, पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’
दुसऱ्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीने केले ‘हे’ भयानक कृत्य, पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’
दुसऱ्या पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीने केले ‘हे’ भयानक कृत्य, पण म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी’
मंदसौर : मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीपासून सुटका मिळावी आणि कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी एका व्यक्तीने वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपल्या पत्नीला विषारी सापाच्या दंशाने मारण्याचा प्रयत्न केला. यासाठी सहा तासात दोनवेळा सर्पदंश केला. पण म्हणतात…
View On WordPress
0 notes
#सत_भक्ती_संदेश
संत गरीबदास जी ने सांगितले आहे कि परमेश्वर कबीर जी म्हणतात. कि जे माझ्या शरणात
कोण्या जन्मात आले आहे, मुक्त होऊ शकले नाहीं, मी त्याला मुक्त करण्यासाठी काही पण
लीला करत असतो. जसे सतयुगात प्रहलाद भक्ताची रक्षा करण्यासाठी नरसिंह रूप धारण करून हिरण्यकशिपु ला मारले हाते.
Sant Rampal Ji Maharaj
13 notes
·
View notes
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं...
समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आपल्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय़ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असत���.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, समोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाचा favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes
·
View notes
तिच्या ' तसल्या ' फोटोची त्याला चटकच लागली , तरुणीने देखील केल्या मर्यादा पार अन..
तिच्या ‘ तसल्या ‘ फोटोची त्याला चटकच लागली , तरुणीने देखील केल्या मर्यादा पार अन..
महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना समोर येत असताना अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात समोर आलेली असून एका प्रेमप्रकरणात वाहत गेलेल्या तरुणीने तिच्या प्रियकराने मागितल्यानंतर चक्क स्वतःचे अश्लील फोटो त्याला सोशल मीडियावर शेअर केले मात्र काही कालावधीत जेव्हा त्यांच्यात बिनसलं त्यावेळी या युवकाने तिचे ‘ तसले ‘ फोटो तिचा भाऊ आणि तिच्या कुटुंबासोबत शेअर केले आणि त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
तिच्या ' तसल्या ' फोटोची त्याला चटकच लागली , तरुणीने देखील केल्या मर्यादा पार अन..
तिच्या ‘ तसल्या ‘ फोटोची त्याला चटकच लागली , तरुणीने देखील केल्या मर्यादा पार अन..
महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना समोर येत असताना अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात समोर आलेली असून एका प्रेमप्रकरणात वाहत गेलेल्या तरुणीने तिच्या प्रियकराने मागितल्यानंतर चक्क स्वतःचे अश्लील फोटो त्याला सोशल मीडियावर शेअर केले मात्र काही कालावधीत जेव्हा त्यांच्यात बिनसलं त्यावेळी या युवकाने तिचे ‘ ��सले ‘ फोटो तिचा भाऊ आणि तिच्या कुटुंबासोबत शेअर केले आणि त्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
उपलब्ध…
View On WordPress
0 notes
आपला दृष्टीकोन
भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट कामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमुकुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते.
कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा विजय होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे.
रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ही गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून….
जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes
·
View notes
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी ��ुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes
·
View notes
”444 KG चा पोलीस अधिकारी….’ जेव्हा पत्नी त्याला लठ्ठपणामुळे सोडून गेली तेव्हा…”
”444 KG चा पोलीस अधिकारी….’ जेव्हा पत्नी त्याला लठ्ठपणामुळे सोडून गेली तेव्हा…”
”444 KG चा पोलीस अधिकारी….’ जेव्हा पत्नी त्याला लठ्ठपणामुळे सोडून गेली तेव्हा…”
मुंबई – जगात असे अनेक लोक आहेत ज्यांचे वजन कोणत्या ना कोणत्या कारणाने खूप वाढले होते आणि नंतर त्यांना वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली. आजही अनेक लोक आपले जीवन जगत आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशीच एक व्यक्ती होती. ज्याचे वजन 444 किलो झाले होते. जेव्हा त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा त्याचे वजनही…
View On WordPress
0 notes
सातारी कंदी पेढा
मिथक आणि वास्तव
भारतामध्ये पेढा बऱ्याच ठिकाणी उत्पादित होतो, प्रत्येक ठिकाणची पेढा बनविण्याची पद्धत आणि खासियत वेगळी आहे. त्यामुळेच पेढ्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात.
मथुरेचे पेढे, सातारी कंदी पेढे, राजस्थानमधील चिवाला येथील पेंडा, धारवाडी पेढा, कुंथलगिरी येथील पेढा, गुजरात भुज येथील पेढा, नरसोबाची वाडी येथील पेढा, जेजुरी येथील पेढा अशी काही खास ठिकाणे आहेत.
सातारी कंदी पेढा आणि मथुरा, कुंथलगिरी, नरसोबाची वाडी येथील पेढ्यांमध्ये साम्य आढळते. तरीही भाजणीची उत्कृष्ट पद्धत आणि फिक्केपणा तसेच मर्यादित गोडवा यामुळे सातारी कंदी पेढाच भारतामध्ये वरचढ आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
सातारी कंदी पेढा हा खमंग भाजणीचा, खरपूस भाजलेला, मर्यादित गोडव्याबरोबरच वेलचीचा निसटता स्वाद देतो.
कंदी भाजणीमुळे तोंडात पटकन विरघणारा पेढा हे सातारी कंदी पेढ्याचे वैशिष्ट्य.
कंदी पेढा नाव कसे पडले याला काही आख्यायिका आहेत, कोण म्हणते ब्रिटिशांनी दिले, कोण म्हणते करंडीत मिळायचा त्यामुळे , कोण म्हणते कंदमुळे असलेल्या रानातून भागातून खवा यायचा त्यामुळे ..वगैरे वगैरे...
या सर्व आध्यायिका धांदात चुकीच्या आहेत.
पेढ्याच्या खरपूस भाजणी लाच कंदी भाजणी म्हणतात ..
पेढा तयार होताना जी खरपूस भाजणी असते तिलाच कंदी नावाने ओळखलं जातं.
'कंदी भाजणीचा पेढा' अशी तुळजाराम मोदी यांची पूर्वी एअर इंडियाच्या विमानांमध्ये जाहिरात असायची.
भाजणीमुळे जो मंद सुगंध पसरतो त्यावरून कंदी भाजणीची चाचणी लक्षात येते.
कंदी भाजणी हे एक कौशल्य आहे, प्रतिभा आहे. हे कौशल्य, ही प्रतिभा संपादन करणं प्रत्येकाला जमणे केवळ अशक्य. म्हणूनतर प्रत्येक दुकानातील पेढ्याच्या चवीमध्ये फरक आहे.
खवा भाजणे, प्रमाणात साखर घालणे, ती विरघळली कि इलायची पेरणे हे कोणीही करू शकते, त्याला फार काही ज्ञान लागत नाही.. पण हीच कंदी भाजणी असा गैरसमज करून घेत अर्धवट ज्ञान घेऊन असंख्य कंदी पेढ्याचे व्यापारी तयार झालेत.
मात्र अस्सल कंदी भाजणी घेणे मोजक्याच पारंपरिक आणि खानदानी घराण्यांना जमते..
पुर्वी तुळजाराम मोदी, नारायणराव लाटकर, बी. एम. लाटकर, बाळप्रसाद मोदी, राजाराम मोदी हे स्वतः भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन, देवपूजा करून सोवळ्यातच दूध घोटवायचे .. त्याचा खवा बनवायचे, तदनंतर लगेच तो खवा मुस्त्याने घोटवत अस्सल कंदी पद्धतीने भाजत कुंदा मारायचे..
यानंतरच गडी लोकांना म्हणजेच कामगारांना कारखान्यात प्रवेश असायचा, त्यांचे काम फक्त पेढे हातावर वळत गोलाकार बनवून ताटात लावून दुकानामध्ये विक्रीला पाठवायचे असे.
असाच आणि असाच नियम होता.
नंतरच्या पिढीने उदार धोरण स्वीकारत मोजक्या विश्वासहार्य लोकांना ही भाजणी कशी असते याचे ज्ञान दिले...आणि कंदी भाजणीचे रहस्य हळहळू जगजाहीर झाले.
कोणत्याही पदार्थाला भौगोलिक परिस्थिती सुद्धा तितकीच महत्वाची आणि आवश्यक असते.. तशीच कंदी पेढ्याला सातारचे आल्हाददायक वातावरण पण लाभले..
आणि म्हणूनच कंदी पेढ्याला सातारी कंदी पेढा हे नाव मिळाले आणि सातारी कंदी पेढा जगातल्या खवैयांच्या जिभेवर रुळला.
पुर्वी कंदी पेढा बनविताना उत्पादक स्वतःच खवा बनवायचे, त्यासाठी सुरवातीला साताऱ्याच्या डोंगराळ भागातू��� दूध यायचे, नंतर कोल्हापूर बॉर्डर वरून यायचे .. आजही सातारा आणि कोल्हापूर येथे दुधाचा दर्जा तुलनेने सर्वोत्कृष्ट आहे.
काळ बदलला, कंदी पेढा बनवायचे अर्धवट टेक्निक जगजाहीर झाल्याने बरेचजण या व्यवसायात उतरले .. तयार खवा घेऊन पेढा बनवू लागले तिथेच चव बदलायला सुरवात झाली.
अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनविणे सोपे असते तर साताऱ्यात आजपर्यंत एकच कै. तुळजाराम मोदी यांना मिठाई शास्त्रज्ञ म्हणून त्या काळच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले गेले नसते. असो..
(मोदी-लाटकर याबद्दल परत कधीतरी माझ्या शब्दात मांडेन)
कच्या मालाचा दर्जा घसरला आणि साहजिकच फिनिश गुड्स वरती परिणाम झाला.
परराज्यातील लोकांनी सुद्धा या व्यवसायामध्ये उदरनिर्वाहासाठी प्रवेश केला. मात्र त्याचा दर्जा टिकविण्यात त्यांना रस नसल्याने केवळ आर्थिक उन्नत्तीसाठी पेढ्यांमध्ये साखरी पेढा, दोन नंबर अशा क्वालिटी आल्या. त्यामुळे चवीचा दर्जा अजून खालावत गेला. आतातर मैदा पण मिसळतात काही जण.. असो..
कंदी पेढ्यांचे उत्पादक ते कंदी पेढ्यांचे व्यापारी हा साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा प्रवास कडू आहे. दुर्दैवी आहे.
ग्राहक पण याला काही प्रमाणात जबाबदार आहेत.. वाटायचे तर आहेत म्हणून दोन नंबरची क्वालिटी डिमांड ग्राहकांनीच निर्माण केली.. दोन नंबर पेढा निर्माण झाला अन वाटणारे आणि खाणारेपण मूळ चव विसरले 🤦🏻
फारच अति झालंय म्हणून आता साताऱ्याचा कंदी पेढा जीआय मानांकनाखाली आणणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी कंदी पेढ्याचा धंदा मांडलाय ते याला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे.
असो.. इतर कोणाबद्दल मी सध्या तरी बोलणार नाही .. माझ्याबद्दल इतकंच सांगेन कि माझ्याकडे अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनतो, अजूनही लाकडाच्या, कोळशाच्या ताव्यावर भाजला जातो, चाचणी पारंपरिक पद्धतीने होते, खवा स्वतःचा आहे (बाहेरचा बिलकुल नाही), हायजिन मेंटेन असते, कंदी भाजणीची मूळ चव जपणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे.
ही कंदी पेढ्याची चव अनुभवायला जरूर या.
येणे शक्य नसल्यास मला 91455-00012 ला मेसेज करा मी तुम्हाला पोच करेन. (अर्थातच विनामूल्य).
ही पोस्ट लिहण्यास सातारकरांनी मला टॅग केले, मेसेज केले, हक्काने सांगितले, समक्ष भेटून सांगितले .. (पाठपुरावाचं केला जणू.. 😀)..
या बहुमानाबद्दल आभार न मानता ऋणी राहणे मी पसंत करेन.
फेसबुक सातारा या व्यासपीठाचे अत्यंत प्रामाणिकपणे आभार.
टीप:- जीआय मानांकनासाठी छत्रपती उदयनराजे यांनी पुढाकार घेतला असून युवानेते संग्राम बर्गे त्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना आपल्याच साताऱ्याचे श्रीधर पारुंडेकर, महेश निकम टेक्निकल करस्पॉन्डन्स पूर्ण करण्यासाठी साथ देत आहेत. आई जगदंबा हे कार्य पूर्णत्वाला नेवो 🙏🏻🕉.
कंदी पेढ्याच्या विक्रेत्यांना मी एवढच विनंती करेन कि दर्जा ठेवा .. ग्राहकांनी पण दर्जा बघावा .. 🙏🏻
याआधी आपल्या साताऱ्याचे राजेंद्र पाटील आणि पुणेस्थित आंतरराष्ट्रीय फूड एक्सपर्ट डॉ. उदय पोतदार यांनी कंदी पेढ्याविषयक अभ्यासपूर्ण पोस्ट केल्या आहेत .. त्याची लिंक कमेंट मध्ये देईन.
वरील पोस्ट माझ्या वैयक्तिक प्रत्यक्ष अनुभव, घेतलेली मेहनत, तिचा कस आणि आपल्या सर्वांनी दिलेली प्रेरणा यातून निर्माण झालेली आहे.
गोडवा वाढवूया..
प्रशांत मोदी (लाटकर)
जगप्रसिद्ध सातारी कंदी पेढ्याचे उत्पादक :-
मोदी'ज् नारायण पेढेवाले
विसावा नाका मारुती मंदिराशेजारी,
विसावा नाका, सातारा
91455-00012
वरील फोटो श्री नरेंद्र जाधव यांनी माझ्या कारखान्यात काढला आहे.
हाच फोटो कित्येक व्यापारी वापरतात. 🤦🏻😀
कृपया शेअर करा .. कॉपी पेस्ट करा
2 notes
·
View notes
हमीद...
१९६९-७० साल असावे. बैठकीत एक किडकिडीत मुलगा रोज आलेला दिसायचा. डोक्यावर गांधी टोपी, विजार अन सदरा घातलेला तो मुलगा ओसरीवर उखळाशेजारी बसून जेवण करायचा. आई ताट वाढून त्याच्या समोर ठेवायची. दोन पायावर उकड बसून खाली मान घालून शांतपणे झटपट जेवण उरकायचा. मांडी घालून बसलेलं त्याला आम्ही कधी पाहिले नाही. जेवण झाले की ताट अंगणात मोरीवर धुऊन उखळाशेजारी खांबाला टेकवून ठेवायचा अन झर्रकन बैठकीत निघून जायचा. काहीच बोलायचा नाही. बैठकीत आम्ही जायचो तेव्हा तो कपाटातल्या फाईली काढून काहीतरी खरडत बसलेला दिसायचा. रात्री बैठकीतच झोपायचा.
तो कोण होता हे कळायचे आमचे वय नव्हते पण लवकरच तो आम्हाला आवडू लागला. कारण हात धरून तो आम्हाला बाजारात घेऊन जायचा. दोन पैशाची लिमलेटची गोळी घेऊन द्यायचा. आम्ही त्याच्यावर प्रचंड खुश होतो. त्याच्याशी बोलायला आम्हाला आवडू लागले. सर्वांचे ऐकून आम्हीही त्याला हमीद या नावाने हाक मारू लागलो. तोही आता बराच खुलला होता. पण फक्त आमच्यापुढेच. दादा, आई आणि तात्यांसमोर तो खाली मान घालूनच उभा असायचा. तोंडातून शब्द फुटायचा नाही. संध्याकाळी बैठकीत आम्ही त्याला बोलत बसायचो. बैठकीच्या खिडकीत तो आम्हाला उचलून बसवायचा अन गमती जमती सांगायचा.
हमीद आमच्या घरी आला तेव्हा पंधरा वर्षाचा होता. आमच्या घरीच रहायचा. सांगेल ती कामे करायचा. बैठक साफ करणे, फाईली तयार करणे, कोर्टाची डायरी लिहिणे, पक्षकारांना तारखा देणे, सकाळी बैठकीतले काम आटोपले की फायलींचा गठ्ठा घेऊन कोर्टात जाणे हे त्याचे नित्याचे काम. हे काम करणार्याला मोहरीर म्हणतात असे मोठेपणी समजले. याव्यतिरिक्त आईने सांगितलेले सामान बाजारातून आणून देणे, कधी बबर्या आला नसेल तर जनावरांना चारा टाकणे, पाणी भरणे, ओसरी झाडून देणे, रासणीला शेतात जाणे ही कामेही तो आनंदाने करायचा. सणासुदीला बुंदीचे लाडू खायला त्याला फार आवडायचे. हक्काने म्हणायचा ‘पोली नको, और लाडू वाडो’.
वाड्यासमोर असलेली ओमीताईंची बालवाडी संपून मी आणि बाळूने भारत विद्यालयात प्रवेश घेतला. आमच्या प्रवेशाचे काम हमीदनेच केले. त्यावेळी माझी जन्म तारीख गुरूजींनी विचारली. मी तोंडातल्या तोंडात एकोणीस जानेवारी सांगितली. लगेच हमीद गुरूजींना म्हणाला ‘उन्नीस बिन्नीस कुछ नही जी, छब्बीस जनवरी लिखो. अपना प्रजासत्ताक दिन है इतना अच्छा.’ गुरूजींनीही त्याचे ऐकले अन माझा नवीन वाढदिवस साजरा केला. नशीब वर्ष बदलले नाही. बाळूची मात्र तारीख बरोबर ठेवली पण वर्ष माझेच टाकले. हमीद कृपेने आम्हा दोघा भावांच्या वयाचे अंतर फक्त तीन महिनेच राहिले!
आम्हाला शाळेत सोडवायलाही सुरूवातीला हमीद यायचा. उमरगा त्यावेळी लहान गाव होते. पण शाळा हायवेच्या पलिकडे असल्यामुळे आई हमीदला पाठवायची. पुढे काही दिवसातच आम्ही आमचे जायला लागलो.
आम्ही कधी कधी त्याच्यासोबत शेताला जायचो. झाडाखाली बसून तो मुकेशची गाणी म्हणायचा. ‘आ लौट के आजा मेरे मीत...’ हे त्याच्या आवडीचे गाणे. खूपदा तो तेच गाणे ऐकवायचा. त्याकाळी रेडीओ ऐकणे अन राजश्री थिएटरमध्ये सिनेमा पाहणे हीच करमणुकीची साधने होती. त्यात हमीदच्या गाण्याची भर पडली.
दिवाळी आली की आम्ही हमीद बरोबर जनता किराणा भांडारमध्ये जायचो. दोन पोते भरून सामान आणले जायचे. सामान लिस्टप्रमाणे तपासणे, बील चेक करणे आणि ते पोते घरी पोहोचवणे ही कामे हमीद करायचा. त्याकाळी आजच्यासारखे कोणतेही सामान कधीही मिळत नसे. दिवाळीतच सुवासिक तेल, उटणे, मोती साबण, विशिष्ट आगरबत्त्या, धुपबत्त्या मिळायच्या. दुकानात हे साहित्य पहायलाच आम्हाला मजा यायची. सामान आणणे झाले की आमचा तगादा सुरू व्हायचा फटाक्यासाठी. हमीदच आम्हाला भारत विद्यालयाच्या ग्राऊंडवर असलेल्या दळगडेच्या एकमेव स्टॉलवर घेऊन जायचा. काय काय घ्यायचे हे तोच ठरवायचा. त्याप्रमाणे सर्व फटाके घेऊन उड्या मारतच आम्ही घरी यायचो. घरी आल्याबरोबर प्रवीण, मी व बाळूचे वाटे व्हायचे. मग धुमधडाका!
दिवाळीचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे नवीन कपडे. ही जवाबदारीही हमीदचीच असायची. तो आम्हाला घेऊन अनिल ड्रेसेसमध्ये जायचा. त्याकाळी आतासारखी भरपूर व्हरायटी नसायची. सणासुदीला फक्त नवीन स्टॉक यायचा त्यातून आम्ही कपडे निवडायचो. त्यातही ‘ये तुमको अच्छा दिखताय जी’ म्हणत हमीद त्याच्या मनाचे घ्यायला लावायचा. नव्या कपड्याचा गठ्ठा घेऊन तो घरी येईपर्यंत आम्ही नाचतच घरी पोहोचायचो.
शेतात डवारा असला की हमीद आणि आम्ही शेतात झोपायला जायचो. रासणीच्या आदल्या दिवशी शेतातच अन्न शिजवले जायचे. गडी माणसे, आजुबाजूचे शेतकरी आणि आम्ही एकत्र जेवायचो. आई शिधा बांधून द्यायची. गार वार्यात बसून गड्यांनी बनवलेली भाकरी अन पिठलं खायला खूप मजा यायची. त्यात हमीदच्या गाण्याची आणि विनोदी किस्से सांगायची भर असायची.
हळूहळू हमीद घरचा महत्वाचा व्यक्ती झाला होता. आजारपण असो, दवाखाने असो, बाजार असो, पेरणी रासणी असो, लग्न कार्य असो, सणवार असो, त्याच्याशिवाय पान हलायचे नाही. सोलापूरहुन दादांनी गॅस कनेक्शन घेतले होते. तिथूनच सिलेंडर भरून आणावे लागायचे. हे कामही हमीदच करायचा. कधी कधी आम्ही त्याच्यासोबत सोलापूरला जायचो ते केवळ ऑटोरिक्षात बसायला मिळावे म्हणून!
आमच्याकडे निळ्या रंगाची हिल्मन कार होती. हमीद अर्धा मेकॅनिकच झाला होता. गाडीला हँडल मारणे, रेडिएटरमध्ये पाणी घालणे, कधी रस्त्यात पेट्रोल संपले तर एखाद्या ट्रकमध्ये जाऊन कॅनमध्ये पेट्रोल भरून आणणे अशा कामासाठी दूरच्या प्रवासात हमीदला सोबत घेतल्याशिवाय जमायचेच नाही.
हमीदचे लग्न गुलबर्ग्याला झाले तेव्हा प्रवीण त्या लग्नासाठी गेला होता. मोठा भाऊ दिलीप तिथेच इंजिनिअरिंगला होता. ते दोघे मिळून लग्नाला उपस्थित होते. लग्न झाल्यावर त्याने एक खोली भाड्याने घेऊन स्वतंत्र संसार सुरू केला. तोपर्यंत आमच्या घरीच रहायचा. दर ईदला आम्ही त्याच्या घरी जायचो. तिथेच आम्ही पहिल्यांदा शिरखुरमाचा आस्वाद घेतला. तसा शिरखुरमा परत कधी प्यायला मिळाला नाही.
आमच्या सर्वांचे बालपण, शैक्षणिक प्रवास अन लग्न हे सर्व हमीदच्या साक्षीने झाले. पुढे आम्हा सर्वांची मुलेही त्याच्या अंगाखांद्यावर खेळली. आमच्या सहवासात राहून त्याला आमची आवड निवड समजली होती. लग्नासाठी आलेल्या स्थळासोबत नाते जमेल की नाही हे ती आलेली पाहुणे मंडळी पाहुनच तो ओळखायचा. माझ्यावेळेस मुलगी आणि तिचे आईवडील पाहुनच तो म्हणाला ‘यहां पे जमताय देखो, तुम लिख के लो’. अन खरेच जमले!
असा हा हमीद. दादानंतर प्रवीणसोबतही मोहरीर म्हणून काम करत होता. कोर्टाचे काम करत करतच त्याने आपला प्रपंच सांभाळला. अंगात सदैव एकच ड्रेस. चप्पल कधी असायची कधी नाही. स्वत:वर खर्च न करता त्याने मुलांना वाढवले. खूप कष्ट केले. अन एक दिवस अचानक वयाच्या साठाव्या वर्षी हार्ट अॅटॅकने जग सोडून निघून गेला! आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटले. जवळपास पंचेचाळीस वर्ष अगदी प्रामाणिक सेवा देणारा अन सर्वांशी जीव लावणारा हमीद, अनेक आठवणी मागे ठेऊन काळाच्या पडद्याआड निघून गेला...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
5 notes
·
View notes