Tumgik
#विद्यार्थ्यांचे
Text
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण
युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे अकरा महिन्यांपासून ऑनलाइन शिक्षण Ukraine Students Education: फेब्रुवारीत रशिया-युक्रेनमधील संघर्षाने विघातक स्वरूप धारण केले. युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. त्यामध्ये हजारो भारतीयदेखील होते. भारत सरकारने सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणले होते. नागपुरातून एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचादेखील…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
शिक्षिका ममता बंडाठे यांच्या मार्गदर्शनाला यश | सैनिकी शाळा व नवोदय परीक्षेत 6 विद्यार्थ्यांचे सुयश
तिरोडा : असीम सराफ सेन्ट्रल अकाडेमी तिरोडा येथील शिक्षिका ममता आनंद बंडाठे यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिकी शाळा व नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेबाबत यथायोग्य मार्गदर्शन केले व त्याबाबत शिकविले. त्यामुळे सदर परीक्षांमध्ये 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अर्णव मनोजकुमार बडोले (मेरिटोरिअस पब्लिक स्कूल), पार्श्व गजेंद्र ठोंबरे (असीम सराफ सेन्ट्रल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
एका शिक्षिकेने तिची इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची चित्रे ट्विटरवर प्रकाशित केली
एका शिक्षिकेने तिची इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची चित्रे ट्विटरवर प्रकाशित केली
लहान मुले निर्मळ मनाची असतात. जे असतात ते बोलून. कधी त्यांचा खोडसाळपणा पोट धरू हसतो. त्यांच्या गोंडस वागण्याने वातावरण आनंदी होते. संस्कृतीच एक क्यूट प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका शिक्षकाने आपल्या पहिल्या वर्गात आपले चित्र बनवले होते. ताक पाखरनी या शिक्षकाचे चित्र काढण्याचा प्रयत्न केला. यातील काही चित्रे तुम्ही या गुणाचे कौशल्याचे वर्णन कराल तर काही चित्रे तुम्हाला हसू आवरणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 13 days
Link
ICSE ISC Marksheet : ICSE 10वी आणि ISC 12वी विद्यार्थ्यांचे मार्कशीट येथून मिळवा !
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
१८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतीक ठरणार-'मन की बात'च्या एकशे दहाव्या भागात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन;विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे
आणि
रांची कसोटीत इंग्लंडचं भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं आव्हान
****
पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकित विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला, वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांना, आगामी १८ व्या लोकसभेसाठी सदस्य निवडीची संधी मिळत असल्यानं ही १८ वी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतिक ठरणार असल्याचं मोदी म्हणाले. आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय आशय निर्मिती पुरस्कार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
महाराष्ट्रातल्या जल संरक्षण क्षेत्रात कार्यरत कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी आज संवाद साधून त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली. तीन मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्य जीव संरक्षण दिनाच्या अनुषंगानं वन्य जीव संरक्षणा संदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची  संख्या अडीचशेहून अधिक झाली असल्याचं त्यांनी नमुद केलं. राज्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजिक खटकली गावातील ग्रामस्थांचं कौतुक करुन पर्यटकांच्या निवासाची, त्यांनी केलेली व्यवस्था उत्पन्नाचं साधन बनल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या विविधतेचा उल्लेख करताना मातृभाषेचा उपयोग करण्यावर भर देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने `मन की बात` हा कार्यक्रम होणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या दरम्यान नागरिकांनी सामाजिक तसंच राष्ट्रीय यशोगाथांबाबत `हॅशटॅग मन की बात`च्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया पाठवत राहावं, तसंच या कार्यक्रमातल्या मागिल मालिकेतील मुद्यांवर आधारित छोट्या चित्रफिती यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलं.
****
दरम्यान, देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. गुजरातच्या राजकोट इथून दूरदृष्य प्रणालीव्दारे राज्यातल्या पुणे, अहमदनगर, बुलडाणा, नंदुरबार, अमरावती आणि बीड जिल्ह्यातल्या पाच जिल्हा रुग्णालयांच्या एकशे ३५ कोटी पाच लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन तसंच राज्यातल्या ८८ कोटी १८ लाख रुपयांच्या १० कामांचं लोकापर्णही यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते उद्या "अमृत भारत स्टेशन योजने" अंतर्गत ५५४ अमृत रेल्वे स्थानकं, उड्डाण पूल तसंच भूयारी पूलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे. यात नांदेड विभागातल्या हिमायत नगर, भोकर, मानवत रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या योजने अंतर्गत, देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी याबाबत अधिक माहिती दिली -
कल 26 तारीख को माननीय प्रधानमंत्रीद्वारा 554 स्टेशन्स और 1500 से उपर रेल्वे ओव्हरब्रीज या अंडरपास इनका शीलान्यास, जहां पे पुरे हो गये है, वहां पे उद्‌घाटन किया जायेगा। नांदेड डिवीजन में ये 52 जगह पे आयोजन है। यहां हमारे पास चार स्टेशन्य है जिनका फाऊंडेशन स्टोन लेइंग माननीय प्रधानमंत्री द्वारा किया जायेगा, जिसमे हिमायतनगर, भोकर, मानवतरोड और रोटेगाव हैं। इसके अलावा 19 आर ओ बी आय यु पी ज्‌ है।
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय सहा वर्षे पूर्ण असावे तसंच याबाबत सर्व शाळांनी खात्री करावी असे आदेश दिले आहेत. यांसदर्भात शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे.
****
राज्य विधीमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरूवात होत आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह पुरवणी मागण्या, लेखानुदान विनियोजन विधेयकं, शासकीय विधेयकं याविषयांवर यावेळी चर्चा होणार आहे.
दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधीपक्षांनी घेतला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल देशमुख, काँग्रेसचे भाई जगताप, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील यावेळी उपस्थित होते.
****
येत्या सहा महिन्यात राज्य शासनाचे सर्व व्यवहार ऑनलाइन होणार असल्यामुळे एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार असल्याचं विखेपाटील यांनी सांगितलं.
****
मराठा समाज आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मनोज जरांगे-पाटील यांनी आता आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते आज सोलापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळाने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट जरांगे पाटील यांनी सोडून द्यावा आणि आंदोलन स्थगित करावं असं आठवले यांनी म्हटलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही शासन सकारात्मक असल्याचं आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
शिक्षक संघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत आज चर्चा केली. शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, यासारख्या मागण्यांसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी पेपर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचं यावेळी जाहीर केलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष २०२०, २०२१ आणि २०२२ चे विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत. बाजी उम्रदचे श्रीकृष्ण नामदेव डोंगरे, कर्जतचे पांडुरंग निवृत्ती डोंगरे, ठालेवाडीचे उदयसिंग सुखलाल चुंगडे, भराडखेडा इथले रामदास शेषराव बारगाजे, अंबड तालुक्यातल्या खंडेगाव इथल्या सुचिता दत्तात्रय शिनगारे, नंदापूर इथले रामेश्वर भगवान उबाळे यांचा यामध्ये समावेश आहे. एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात ४० धावा केल्या. रोहीत शर्मा २४ आणि यशस्वी जैस्वाल १६ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. झॅक क्रॉलीने सर्वाधिक ६० धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने ३० धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार गडी बाद केले.
तत्पूर���वी, भारताचा पहिला डाव ३०७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडला दुसऱ्या डावासाठी ४६ धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १४५ धावा करत सर्वबाद झाला. इंग्लंडनं भारताला जिंकण्यासाठी १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत आज पोलीस मुख्यालयाच्या क्रीडा मैदानावर पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह, महिला अधिकारी तसंच मुलींनी पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतला. शस्त्र प्रदर्शन आणि सर्प माहिती शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं. हा महोत्सव बुधवारपर्यंत चालणार आहे.
****
0 notes
sanglihaldi · 5 months
Text
MPSC Success Story : कुठलाही क्लास न लावता निफाडची गृहिणी बनली क्लास टू अधिकारी; संसार सांभाळत मिळवलं यश!
नाशिक : आजकाल अधिकारी होण्यासाठी लाखो मुलं जीवाचं रान करत असतात. कुटूंबियांपासून दूर राहुन दिवस रात्र एक करत मेहनत घेत असतात. काहीजण तर हजारो रुपयांची फी भरून क्लास लावून स्पर्धा परीक्षा (MPSC Exam) देत असतात. तर काहीजण कोणताही क्लास न ना लावता यशाला गवसणी घालत असतात. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावं तेवढं कमी असतं, अशीच ग्रामीण भागातील आलेली, कोणताही क्लास न लावता अटकेपार झेंडा लावणारी निफाडची वंदना गायकवाड (Vandana Gaikawad) अधिकारी झाली आहे.
for more details click here
1 note · View note
aissmseducation · 8 months
Text
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व
अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. तसेच औद्योगिक क्षेत्रांमधून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेनंतर विद्यार्थ्यांना खाजगी त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रांमध्ये कनिष्ठ अभियंता / निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ[MSBTE] मुंबई यांच्याशी संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विविध शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रांमधील तज्ञांशी विचार विनिमय करून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या थेअरी व प्रात्यक्षिका बरोबरच मायक्रोप्रोजेक्टचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन तसेच सांधिक कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होते. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा आठवड्यासाठी विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सांधिक प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक तसेच सांधिक कौशल्य वाढवण्याकामी मोठी मदत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता अभियांत्रिकी पदविका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडून पदविकाधारक विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नेहमीच प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भविष्यात पदविका अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व हे वाढत राहणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा खालील विविध शाखेमध्ये उपलब्ध आहे
सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉईंग, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बिल्डिंग मटेरियल, सर्व्हे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजीनियरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेअरीऑफ मशीन, फ्लुईड मेकॅनिक्स , मशीन डिझाईन, अप्ल��इड मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
कॉम्प्युटर इंजीनियरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल टेक्निक्स, जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मोबाईलॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, इमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर अँड अँप्लिकेशन्स, लीनियर इंटिग्रेटेड सर्किट. बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्क अँड डेटाकम्युनिकेशन, इमर्जिंग ट्रेंडस इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयाचा अंतर्भाव केला आहे.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, ऍडव्हान्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मॅनेजमेंट, सॉलिड मॉडेलिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटो कॉम्पोनन्ट्स डिझाईनिंग, टू अँड थ्री व्हीलर टेक्नॉलॉजीस इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटस, इलेक्ट्रिकल पावर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रिकल पावर अँड डिस्ट्रीब्यूशन, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, एनेर्जी कन्सर्वेशन अंड ऑडिट, इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन, मेन्टेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्लांट युटिलिटीज, प्लांट इकॉनॉमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, केमिकल इंजीनियरिंग थर्मो डायनामिक्स, केमिकल प्रोसेस इंस्त्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फ्लुईड फ्लो ऑपरेशन, केमिकल रिएक्शन इंजीनिअरिंग, मेंब्रेन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये डाटा स्ट्रक्चर युजिंग पायथोन, स्टोरी टेलिंग अँड व्हिज्वलायझेशन, मॅथेमॅटिक्स फोर मशिन लर्निंग, जावा प्रोग्रामिंग फंडामेंटल, एमएल अँड एआय अल्गोरिदम, क्लाऊड कम्प्युटिंग फॉर डेटा इंजिनिअरिंग, बिग डेटा एनालीटीक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या प्रमुख शिष्यवृत्ती
राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी): तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्‍या या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक मागास वर्गीयांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे लाभ: ट्युशन फीच्या आणि परीक्षा फीच्या ५०%. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाजकल्याण विभागाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाज कल्याण विभाग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सवलत दिले जाते लाभ: ५०% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस (फ्रीशिप): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करणे, उच्च शिक्षणाचा द्वारे आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: शिक्षण तसेच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे विद्यार्थ्यांने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहेत. पात्रता निकष: कुटुंबाचे/ पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
व्होकेशनल एज्युकेशन फी रिम्बर्समेंट: आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या स्टेट मायनॉरिटी कम्युनिटी विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना: अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. लाभ: शिष्यवृत्तीची रक्कम कमाल रुपये २५०००/- वार्षिक किंवा वास्तविक शिक्षण शुल्क यापैकी जे कमी असेल ते. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS): ज्या कुटुंबाचे / पालकाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे राखीव प्रवर्गातील नाहीत त्यांना या आरक्षणाचा फायदे घेता येतात. लाभ: १०% आरक्षण तसेच ५० टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ट्युशन फी व्हेवअर स्कीम: चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्यक्षात आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क पूर्ण माफ करण्यात येते. लाभ: १००% शिक्षण शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
0 notes
jagdamb · 1 year
Text
दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यशाची मोहोर उमटवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
यशाच्या प्रवासाची ही फक्त सुरवात आहे, अजून दूरचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे आपल्या लक्ष्यावर ठाम रहा आणि आपले ध्येय गाठा !!!
#10th #pass #congratulations #abhinandan
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
Tumblr media
0 notes
nandedlive · 1 year
Text
१० वीतून ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'आयआयबी फास्ट' चे ऑफलाईन पद्धतीने २ एप्रिल रोजी आयोजन..
Tumblr media
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी २ एप्रिल रोजी ७ ही शाखेत होणार "आयआयबी-फास्ट" नांदेड -- प्रतिनिधी : इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नीट व जेईई परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी व आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी, इंजिनीयर किंवा डॉक्टर बन��्याचा खडतर मार्ग अगदी सोपा करण्यासाठी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट कडून इयत्ता ११ वी प्रवेशासाठी महाराष्ट्राचा महाब्रांड आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट ची आयआयबी फास्ट (फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि.२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविलेली आयआयबी करियर इन्स्टिट्यूट ही डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचविण्याचे कार्य मागील तब्बल २३ वर्षांपासून करत आहे. आजमितीला आयआयबी इन्स्टिट्यूटच्या शाखेचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, पुणे (शहर), पिंपरी (पुणे) या शाखेत विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन केले जात आहे. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर व्हावे अशी अनेक पालकांची ईच्छा असते. परंतु, डॉक्टर, इंजिनिअर होणे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे हे अत्यंत कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार शिक्षण, सकारात्मक वातावरणाची सर्वाधिक आवश्यकता असते तीच शिस्त आणि उच्च नितीमुल्यांच वातावरण आयआयबी विद्यार्थ्यांना देत असते. दरम्यान डॉक्टर, इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी, गुणवत्तेची खाण म्हणून देशभरात ओळख असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये हे वातावरन असल्याने आयआयबी घराघरात पोहचली आहे. दरम्यान, इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट, जेईई ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच आगामी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये इयत्ता ११ वी प्रवेशासाठी इन्स्टिट्यूटची आयआयबी फास्ट
Tumblr media
(फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि. २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या फास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे "एम्स-५०", संकल्प, मिनीसंकल्प या मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या बॅचसह विविध बॅचेससाठी प्रवेश मिळणार आहेत. देशातील नावलौकिक असलेले तज्ञ प्राध्यापक वर्ग, इन्स्टिट्यूटचे काटेकोर असे सूक्ष्म नियोजन आणि त्यामुळेच वर्षानुवर्षे वाढत जाणारा निकालाचा आलेख हे आयआयबी इन्स्टिट्यूटचे वेगळेपण आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर इंजिनिअर होण्याच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी आयआयबी च्या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा हेल्पलाईन वरती संपर्क करावा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे.
Tumblr media
डॉक्टर होणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यातच देशातील चांगल्या आणि नामांकित मेडिकल कॉलेज असलेल्या AIIMS तसे IIT या राष्ट्रीय पातळीवरील कॉलेज मधून पूर्ण व्हावे यासाठी विद्यार्थी दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. परतू ती मेहनत योग्य दिशेने होत आहे का, 2 वर्ष कशा पदधतीने तयारी करावी व ती परिपूर्ण कशी करावी या सगळ्या बाबीं साठी योग्य शिक्षण, संस्था, आणि शिक्षक असणे अत्यंत गरजेचे आहे . आयआयबी इन्स्टिट्यूटमधून प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची नीट, जेईई परीक्षेचे स्वरूप व महत्व समोर ठेवूनच पूर्ण वर्षभराचे काटेकोर नियोजन केले जाते म्हणून नीट निकालात अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने MBBS साठी तर पात्र होतातच त्याच बरोबर अनेक विद्यार्थी AIIMS साठी प्रवेशित होत असतात. गतवर्षीच्या म्हणजेच NEET-२०२२ च्या निकालात महाराष्ट्रातुन पहिल्यांदाच आयआयबीच्या तब्बल ४१ विद्यार्थ्यांना AIIMS मध्ये प्रवेश मिळाल्याचा विक्रम स्थापन झाला आहे. या उत्तुंग यशानंतर आता "AIIMS-५०" ही बॅच सुरू करण्यात आली असून गतवर्षीचा आमचा विक्रम IIB इन्स्टिट्यूटचे विद्यार्थीच मोडीत काढतील व नवीन विक्रम प्रस्थापित करतील असा दृढ विश्वास आहे. -टीम आयआयबी       ------------------------------------------------------ Read the full article
0 notes
nashikfast · 1 year
Text
किल्ले शिवनेरीवर विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
किल्ले शिवनेरीवर विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
शैक्षणिक सहलीतून दिला स्वच्छतेचा संदेश जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची तीन दिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. या अंतर्गत ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, आळंदी, देहू, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, मुरुड जंजिरा, काशिद, अलिबाग आदी स्थळांना भेटी देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
UGC कडून नवे सिंगल विंडो पोर्टल, लाखो विद्यार्थ्यांचे होणार ‘ई-समाधान’
UGC कडून नवे सिंगल विंडो पोर्टल, लाखो विद्यार्थ्यांचे होणार ‘ई-समाधान’
UGC कडून नवे सिंगल विंडो पोर्टल, लाखो विद्यार्थ्यांचे होणार ‘ई-समाधान’ E-Samadhan: विद्यार्थी आणि विद्यापीठांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोगाचे वेगवेगळे पोर्टल्स कार्यरत होते. यूजीसीने या सर्व पोर्टलचे एकत्रीकरण करून ‘ई-समाधान’ नावाने सिंगल विंडो पोर्टल तयार केले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे स्टेटसदेखील त्यांना पोर्टलच्या माध्यमातून बघावयास मिळेल. विद्यार्थ्यांना तक्रार…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार मुंबई, दि.6 : शिक्षण पद्धतीमध्ये बदल करून आता जीवनकौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे अंगभूत गुण आणि कौशल्य ओळखून त्यामध्ये त्यांना पारंगत करणारे जगातील सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes
marathinewslive · 2 years
Text
वादग्रस्त विधेयकाच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये मोबाईल इंटरनेट बंद
वादग्रस्त विधेयकाच्या निषेधार्थ मणिपूरमध्ये मोबाईल इंटरनेट बंद
वाहन पेटवण्यासह जाळपोळीच्या काही घटनांची नोंद झाली आहे. गुवाहाटी: मणिपूरमधील आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अटक केलेल्या नेत्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी काल केलेल्या निदर्शनेनंतर, मणिपूरमध्ये मोबाइल डेटा सेवा पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आली आहे, असे विशेष सचिव (गृह) एच ज्ञान प्रकाश यांनी शनिवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. आदेशानुसार, काही समाजकंटक लोकांच्या भावना भडकावण्यासाठी…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 1 year
Text
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 16 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागून पाच डबे भस्मसात;सुदैवाने जीवितहानी नाही
अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी जाणीवजागृती करणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ऊसतोड कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध
आणि
ऑलिंपिक खेळांमध्ये टी ट्वेंटी क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करायला मंजुरी
****
अहमदनगर आष्टी या रेल्वे गाडीला अहमदनगर जिल्ह्यातल्या शिरडोह इथं आज भीषण आग लागली. या आगीत रेल्वेचे पाच डबे खाक झा��े. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी आग नियंत्रणात आणली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलं नसल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
राज्यात रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी जनतेमध्ये जाणीवजागृती करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. बेदरकारपणे वाहन चालवून इतरांचे जीव धोक्यात आणणाऱ्यांविरोधात कारवाईचे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिले. ते म्हणाले -
हे अतिशय गंभीर आहे. आणि निश्चितपणे अशा प्रकारे अनेकांचे जीव जे धोक्यात घालतात, त्यांच्यावर कारवाई ही करावीच लागेल. या व्हिडिओचीही गंभीर दखल घेतली जाईल. एकीकडे अशा प्रकारचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि दुसरीकडे जाणीव जागृती कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करावा लागेल.
राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी समिती निर्माण केल्या असून सातत्याने या समितीच्या कामगिरीचं पर्यवेक्षण चालू असतं. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त या समितीचे सदस्य असतात, त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा अंमली पदार्थ विरोधी कारवाई राज्यात चालूच राहणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा बैठक घेतली. राज्यातील तरुणांना रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण असून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
****
कोविड काळात आवश्यक उपकरणांच्या खरेदी - विक्रीत अनियमितता प्रकरणात आज प्राप्तिकर विभागाने मुंबई, पुणे, दिल्ली, प्रयागराज या शहरांसह गुजरातमध्ये काही ठिकाणी छापे घातले. कोविड काळात मुंबई महानगर पालिकेसोबत करार केलेल्या कंपन्यांच्या कार्यालयांवर ही कारवाई केली जात आहे. सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना यापूर्वीच अटक केली आहे.
****
दुष्काळाबाबत सरकार गंभीर नसून मंत्रिमंडळाच्या गेल्या काही बैठकांमध्ये दुष्काळाच्या प्रश्नावर कुठलीच चर्चा नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही कोणत्याच समाजाला या सरकारने आरक्षण दिलेलं नाही, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर जातनिहाय जनगणना केली पाहिजे, असं मत पटोले यांनी व्यक्त केलं.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आता विद्यार्थ्यांचे स्वयंचलित स्थायी शैक्षणिक नोंदणी-ऑटोमेटेड पर्मनंट ॲकॅडेमिक रेजिस्ट्री-अपार ओळखपत्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अपार ओळखपत्राद्वारे विद्यार्थ्यांना विशेष क्रमांक मिळणार असून, विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास त्यात साठवला जाणार आहे. मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने आजपासून तीन दिवसात विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याच्या कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
****
ऊसतोड कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात गोदावरी तांडा इथं आज गोर सेनेतर्फे ऊसतोड कामगार महामेळावा घेण्यात आला, या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार रत्नाकर गुट्टे, गोर ऊसतोड कामगार सेनेचे अध्यक्ष अरुण चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
इतर कामगारांप्रमाणे ऊसतोड कामगारांसाठी माध्यान्ह भोजन योजना राबववण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी स्वाधार योजनाही लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं पाटील म्हणाले.
संजय राठोड यांनी यावेळी बोलताना, गर्भवती ऊसतोड कामगारांना ६ महिन्याचे वेतन, तसंच ऊसतोड कामगाराचा मृत्यू किंवा ते जखमी झाल्यास त्यांना किंवा वारसांना एक सन्मानजनक निधी देण्याचा प्रस्ताव सरकारला देणार असल्याचं सांगितलं.
****
ऑलिंपिक खेळांमध्ये टी ट्वेंटी क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करायला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेनेने मंजुरी दिली आहे. समितीच्या मुंबईत सुरु असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉस एंजेलिस इथं २०२८ मध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑलिंपिक्स मध्ये आता टी ट्वेंटी क्रिकेट, बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल, लॅक्रोज, फ्लॅग फूटबॉल आणि स्क्वॅश या खेळांचा समावेश होईल. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत लखनौ इथं आज सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियासमोर २१० धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कुसल परेरानं सर्वाधिक ७८ तर पाथूम निसांकानं ६१ धावा केल्या. श्रीलंकेचा संघ ४४ व्या षटकांत २०९ धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम जम्पानं सर्वाधिक चार, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन तर मॅक्सवेलने एक गडी बाद केला.
****
ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला जालना पोलिसांनी दिल्ली इथून अटक केली. नीरजकुमार शर्मा असं आरोपीचं नाव असून, त्याने सुमारे तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. जालना जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने इंडिया मार्ट या ॲपवर विविध वस्तू खरेदीसाठी पैसे भरले होते, मात्र त्यानंतरही वस्तू देण्यास आरोपीने टाळाटाळ केल्यानं त्याने पोलिसांत तक्रारी दाखल केली. सायबर शाखेच्या पोलिस पथकाने सदर आरोपीला दिल्लीहून अटक करत, त्याच्या ताब्यातून आठ मोबाईल, नऊ सीमकार्ड, विविध कंपन्यांच्या नावाने बनावट स्टँप, आदी साहित्य जप्त केलं आहे. त्याला न्यायालयानं उद्या १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला कोल्हापूर इथल्या अंबाबाई देवीची आज महागौरी रुपात पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी स्थानिक भाविकांसह अन्य ठिकाणहून भाविकांनी मोठी गर्दी केली. आज पुणे पिंपरी चिंचवड, चाकण, सासवड भागातील महिलांचे समूह एकत्रित देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरात दाखल झाले होते.
धाराशिव जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार पूजेस परवापासून प्रारंभ होणार आहे. परवा रथ अलंकार महापूजा, १९ ऑक्टोबरला लल���त पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा, २० ऑक्टोबर रोजी शेषशायी अलंकार महापूजा तर २१ ऑक्टोबरला भवानी तलवार अलंकार महापूजा बांधली होणार आहे.
****
केंद्र सरकारच्या मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत आज धाराशिव तालुक्यातील १२२ गावातून आणलेल्या मातीच्या कलशाची धाराशिव शहरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर १२२ गावातील मातीचे एकत्रीकरण करून नेहरू युवा केंद्राकडे कलश सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना शपथही देण्यात आली.
****
माझी माती-माझा देश या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातल्या विविध ठिकाणांहून जमा करण्यात आलेली माती आणि तांदूळ आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या अभियानाच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द करण्यात आले. या मातीने भरलेले अमृत कलश मुंबईकडे रवाना केले जाणार असून तिथून ते दिल्लीला पाठवले जाणार आहेत.
****
0 notes
mhlivenews · 1 year
Text
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) अभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले…
View On WordPress
0 notes