सहकारी बँकांचे विकासात मोठे योगदान – माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर
सहकारी बँकांचे विकासात मोठे योगदान – माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर
सहकारी बँकांचे विकासात मोठे योगदान – माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर
हडपसर – सहकारी चळवळीचा देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. जनमानसात आपल्या वाटणाऱ्या या सहकारी बँका आधुनिक सोयीद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. तसेच निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना नेहमीच भरभरून मदत करीत आहेत. मुक्त आर्थिक धोरणांमुळे खासगी व व्यापाऱ्या बँका मोठ्या प्रमाणावर सुरू…
View On WordPress
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात प्रचार उद्या संपत असून, सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा, बैठका, पदयात्रा काढून जोरदार प्रचार करत आहेत.
भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्कवर प्रचार सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या सभेला उपस्थित राहणार आहेत.
तर वांद्रे कुर्ला संकुलात विरोधकांच्या इंडिया आघाडीची देखील आज सभा होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या सभेला उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्राचारार्थ निघालेल्या दुचाकी रॅलीत सहभाग घएतला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं, आणि संध्याकाळी नाशिक इथं सभा होणार आहे.
तर महाविकास आघाडीतर्फे खासदार अमोल कोल्हे यांची धुळ्यात, आणि आदित्य ठाकरे यांची सभा नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघात येत्या एक जून रोजी मतदान होणार आहे.
****
भारतभेटीवर आलेले त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान डॉ. किथ ख्रिस्टोफर राऊली आणि त्यांच्या पत्नी शेरॉन राऊली यांचं राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत औपचारिक स्वागत केलं. त्रिनिदाद टोबॅगोने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून प्रेरणा घेतली असं सांगून, भारतीय उद्योजकांनी त्रिनिदाद टोबॅगोच्या विकासात स���भागी व्हावं, असं आवाहन डॉ किथ राऊली यांनी यावेळी केलं. त्रिनिदाद इथं क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या दृष्टीने या भेटीत उद्योजकांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उत्तर - पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात १७३ ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ८५ वर्षावरील १५६, तर २८ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या ८९५ कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान करून घेण्यात आलं.
****
लातूर इथल्या शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन इथं येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, यासाठी विविध पथकं गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकातल्या अधिकारी, कर्मचार्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
****
राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील शेती आणि फळपिकांचं नुकसान झालं, तसंच १९ जिल्ह्यातल्या उन्हाळी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. गोंदिया, भंडारा, नाशिक जिल्हयात सर्वाधिक नुकसान झालं असल्याचं कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अवकाळी पाऊस अजूनही सुरूच असल्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केला आहे.
****
राज्यात खरीप हंगामासाठी पुरेसा खतांचा साठा उपलब्ध असून, कृषी विभागानं यंदा ४४ लाख ५६ हजार टन रासायनिक खतांचा साठा मंजूर केला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यात २९ लाख १९ हजार टन खतांचा साठा होता. उर्वरित खतांचा पुरवठा केंद्राकडून होणार आहे. खतांच्या विक्रीमध्ये काळाबाजार किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याचं आढळल्यास संपर्क साधण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातल्या शिवणी, शिवणखेड गावाच्या शिवारात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी प्रशासनानं वन विभागाच्या मदतीने वन कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामुळे या गावातल्या तसंच परिसरातल्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन, सहायक वनसंरक्षक वैशाली तांबे यांनी केलं आहे.
****
कझाकिस्तानमध्ये अस्ताना इथं सुरु असलेल्या एलोर्डा चषक मुष्टीयुद्धा स्पर्धेत महिलांच्या ५२ किलो वजनी गटात विद्यमान विश्वविजेत्या निखत झरीननं कझाकिस्तानच्या खेळाडुवर पाच - शून्य असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ४८ किलो वजनी गटात मीनाक्षीनं, ५० किलो वजनी गटात अनामिकानं, तर ६० किलो वजनी गटात मनीषा यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार्या सहा सदस्यीय भारतीय टेबल टेनिस संघानं नेतृत्व अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि शरथ कमल करणार आहेत. भारतीय टेबल टेनिस महासंघानं काल या संघाची घोषणा केली.
****
0 notes
��ेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “गती शक्ती कार्गो टर्मिनल”चे लोकार्पण
रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार
– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मराठवाड्याच्या विकासात जालना ड्रायपोर्टचे भरीव योगदान
– केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी
ड्रायपोर्टमुळे उत्पन्न वाढीबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण…
View On WordPress
0 notes
Central Bank of India Apprentice Bharti 2024/Central Bank of India Apprentice Recruitment 2024
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक बँकांपैकी एक आहे. त्याची स्थापना 21 डिसेंबर 1911 रोजी झाली आणि ती संपूर्णपणे भारतीयांच्या मालकीची आणि व्यवस्थापित केलेली पहिली व्यावसायिक बँक होती. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय आर्थिक व्यवस्थेच्या विकासात बँकेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि स्वातंत्र्योत्तर काळातही ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
एक व्यावसायिक बँक…
View On WordPress
0 notes
लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता, समन्वयवादी वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकाला स्मृति दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
#laalbahadurshastri ...
1 note
·
View note
राष्ट्रीय शिक्षा दिवस 2023 | National Education Day: तारीख, इतिहास आणि महत्त्व संपूर्ण माहिती
National Education Day 2023: Date, Theme, History, and Significance Complete Information In Marathi | National Education Day 2023 In Marathi | Essay on National Education Day 2023 | राष्ट्रीय शिक्षा दिवस निबंध
राष्ट्रीय शिक्षा दिवस हा भारता���ध्ये दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हा दिवस मौलाना अबुल कलाम आझाद, प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक, प्रख्यात विद्वान आणि स्वतंत्र भारतातील पहिले शिक्षण मंत्री यांच्या जयंती निमित्त समर्पित आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व हे राष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासात शिक्षणाची महत्त्वाची भूमिका ओळखण्यात आणि मौलाना आझाद यांच्या आदर्शांना चालना देण्यासाठी आहे, ज्यांचा एकता, धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक स्वभाव वाढवण्यासाठी शिक्षणाच्या सामर्थ्यावर विश्वास होता.
राष्ट्रीय शिक्षा दिवस 2023 साजरा करणे मौलाना आझाद यांनी मांडलेल्या मूल्यांची आणि तत्त्वांची आठवण करून देणारा आहे. देशातील शिक्षणाच्या स्थितीवर चिंतन करण्याचा, झालेल्या प्रगतीची कबुली देण्याचा आणि कायम असलेल्या आव्हानांना तोंड देण्याचा हा दिवस आहे. या निबंधात, आपण राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या विविध पैलूंचा शोध घेऊ, ज्यात त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मौलाना आझाद यांचे जीवन आणि योगदान, भारतातील शिक्षणाची स्थिती आणि शिक्षण आणि साक्षरतेला चालना देण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांचा समावेश आहे. Read More
0 notes
Today Marathi Dinvishesh 14 October 2023
Today Marathi Dinvishesh 14 October 2023
१४ ऑक्टोबर २०२३ – दिनविशेष
जागतिक मानक दिन (World Standards Day)
सर्वपित्री अमावस्या
सूर्य ग्रहण
जागतिक मानक दिन
जागतिक मानक दिन हा वर्षातून एकदा, १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मानकांच्या महत्त्वाविषयी जनजागृती करणे आणि मानकांच्या विकासात आणि अंमलबजावणीत सहभागी होणाऱ्या सर्व लोकांना सन्मानित करणे आहे.
मानके ही उत्पादने, सेवा आणि…
View On WordPress
0 notes
मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान अनमोल – राज्यपाल रमेश बैस
मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान ......
मुंबई, : स्वातंत्र्यानंतर मुंबईत स्थलांतर केल्यानंतर सिंधी समाजातील लोकांनी अनेक उत्कृष्ट शैक्षणिक सं���्था स्थापन करून मुंबईच्या शैक्षणिक विकासात अनमोल योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. सिंधी समाजातील लोकांनी स्थापन केलेल्या एचएसएनसी शिक्षण संस्थेने पुढील २५ वर्षांसाठी आपल्या विकासाचा रोडमॅप तयार करून देशविदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी जागतिक दर्जाची…
View On WordPress
0 notes
समाजाच्या विकासात स्त्रियांचे विशेष योगदान : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
जिल्हाधिकारी कार्यालयात मूकबधिर मुलांसोबत “महिला दिन” साजरा
गोंदिया: सावित्रीच्या लेकी शिकल्या, सवरल्या, मोठया झाल्या. शासकीय सेवेत आल्या. ज्या समाजाने त्यांना संस्कार दिले, मोठे केले त्या समाजाला विकसित करण्यासाठी स्त्रियांनी मोलाचे योगदान दिले आहे, असे मनोगत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दि 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ” महिला दिन ” या कार्यक्रमात व्यक्त केले.
सदर…
View On WordPress
0 notes
मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ - अर्ज करण्याची अंतिम मुदत २ मार्चपर्यंत - महासंवाद
मुंबई, दि. 22 : युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, विद्यार्थ्यांना 2 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुलामुलींना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
युवकांना प्रशासनासोबत काम…
View On WordPress
0 notes
गोव्याच्या विकासात श्रीपाद नाईक यांचा सिंहाचा वाटा : मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
https://bharatlive.news/?p=157156
गोव्याच्या विकासात श्रीपाद नाईक यांचा सिंहाचा वाटा : मुख्यमंत्र्यांचे ...
0 notes
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 01 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र दिन आज साजरा होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. देशात सध्या लोकसभेसाठी निवडणुका सुरू आहेत, लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
दरम्यान, महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातल्या नागरीकांना उद्देशून दिलेल्या संदेशात राज्यपालांनी, देशाचं आर्थिक शक्तीस्थान असलेल्या महाराष्ट्रानं देशाच्या पायाभूत विकासात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं सांगितलं.
****
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी कर्मचार्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत नागरीकांनी आवर्जुन मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी केलं.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजरोहण झालं. यावेळी त्यांनी परेड निरीक्षण करून जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जालना इथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी सहा जणांना पोलीस महासंचालक पदानं सन्मानित करण्यात आलं.
****
लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचं योगदान मोठं असून, भविष्यातही प्रगतीची नवनवीन शिखरे सर करण्याचा निश्चय आजच्या महाराष्ट्र दिनी करूया, असं बनसोडे यावेळी म्हणाले.
****
धाराशिव इथं पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या, तसंच संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
****
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. १०७ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, त्यांच्या योगदानामुळेच आपण आज समृद्ध जीवन जगत आहोत, असं सांगून त्यांनी जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. आपल्या भाषणातून त्यांनी सर्व जनतेला महारष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाचं पथसंचलन झालं, तसंच उत्कृष्ट तलाठी पुरस्कार, लोकसभा निवडणुकीत जनजागृती करण्यासाठी रील्स स्पर्धा आणि मतदानाची गुढी या स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मनी यांच्या हस्ते ध्वारोहण करण्यात आलं.
पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब शेख महेमूद यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
****
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आणखी तीन उमेदवारांची आज घोषणा केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना, कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना, तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
मतदार जनजागृतीसाठी आज नाशिक इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली. महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करुन नागरीकांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
****
नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज नांदेड इथून संध्याकाळी सहा वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
0 notes
समूहाने दुखच्या व्यक्तीच्या वा अतिक्रमण करू नये , अशी व्यवस्था व्यवस्था असे स्थूलमानान म्हणता झालायची दुसव्याच्या कष्टाची फळ भोगायची , त्याच्या विकासात अउयव नाही अशा प्रकारची समाजातील कोणाही व्यक्तीने वा समूहाच्या जीवनशैलीवर गैरवाजवी म्हणजे सामाजिक न्यायाची आदर्श भईल दूसण्याच्या स्वातंत्र्यावर झडप त्याला योग्य मोबदला न देता स्वत : आणायचा . त्याला त्याच्या हक्काचा आनंद मिळू द्यायचं व्यवस्था सामाजिक अन्यायाची असते , असे म्हणता येईल थोडक्यात .. समाजातील व्यक्तींनी एकमेकांना बाधक व मारक न होता , शक्य तितक पुरक व पोषक होण्याला वाव देणारी व्यवस्था ही सामाजातील व्यक्तीला एकमेकांना बाधक व मारक न होता , शक्य तितके पुरकू व पोषक दोण्याला मूव देणारी व्यवस्था ही सामाजिक न्यायाची सर्वोत्तम व्यवस्था असे म्हणता येईल . घोडागात , समाजिक अन्यायाची असते , असे म्हणता येईल परंतु सामाजिक सामाजिक न्याय म्हणजे नक्की तरी काय ? आणि त्याची नेमकी उधष्य काय आहेत ? तर ' समता - स्वातंत्र्य- विश्वबंधुत्व व आर्थिक राजकीय - सामाजिक हक्क तसेच स्त्री पुरुष समानता , समाजातील सर्व व्यक्तीना शिक्षणाली विकासाची संधी आदी मूल्य आणि तत्व ही सामाजिक न्यायाची उद्दिष्ट होत तसा सामाजिक न्यायाच प्रश्न मुळात समाजाच्या स्तरीकृत रचनमध्ये गुंतलेले असतात त्यातूनच विविध घटकांमध्ये विषमतेची व अन्यायाची जाणीव निर्माण होते . या विषमतेच्या निराकरणासाठी सामाजिक न्यायाच लढे उभे रहातात व या लयामहान समाजिक न्यायाचा साशय आणि अर्थ अधिक स्पष्ट होता आणि निर्धारीतही केला जाता सामाजिक न्याय ही संकल्पना सर्वप्रथम १,५०० ते २२५०० वर्षांपू ७२ / डाइझम , खिचन , इस्लाम धर्म , तोहदू धर्म हिंदू धर्म इत्यादींच्या शिकवणुकीतून व त्याच काळातील सोफोग्लिस व स्केलिसच्या सीक शोकांतिकांसारख्या पाश्चिमात्य साहित्यातून अवतरली . त्यानंतर धर्माचे सीकरण होऊन ते राज्य आणि सामन्यांशी जोडल्या गेल्यामुळे न्यायाच्या संकल्पनेच नैसर्गिक विकास खुंटला . त्यानंतर न्यायाच्या संकल्पनेचर फरफटत है सतराव्या व पश्चिमात्य समाजात धर्मनिरपेक्ष माननवाद सामाजिक अठराव्या शतकांत बुद्धिराद , वैज्ञानिक कांती व प्रबोधनकाळ यांच्या वाढीबरोबर वाहायला मिळते . या नव्या परिप्रेक्ष्यम सामाजिक संरचनेचे विश्लेषण करवाच्या करा सारख्या राजकीय तत्त्यांनी समाजातील अन्यायकारक बाबांची चिकित्सा केली आणि 7 . त्यातूनच सामाजिक न्यायवर आधारित समाजरचनेवर चाकटीला चालना मिळाले .
-वैभव वैद्य....
0 notes
दीपक मोहिते,
सूर्यातीर,
पंचायतराज ; तीन दशकानंतर प्रभावी अंमलबजावणीसाठी बदल आवश्यक,
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या " स्वप्नातील भारत," प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पंचायतराज व्यवस्था निर्माण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तीन दशकाच्या वाटचालीनंतर ग्रामीण भागात या व्यवस्थेचा लेखा-जोखा मांडायला हवा.ग्रामीण भागातील खेडी या व्यवस्थेमुळे स्वयंपूर्ण झाली का ? जनतेचे राहणीमान उंचावले का ? खेड्याच्या विकासात सामान्य नागरिकांना सामावून घेण्यात आले का ? या तीन प्रश्नांची उत्तरे समाधानकारक नाहीत. ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार आपल्या देशातील पंचायतराज संस्थांना संविधानात्मक दर्जा मिळाला, पण या निर्णयामागे जी उद्दिष्टे होती, ती प्रत्यक्षात सफल झाली का ? या प्रश्नाचे उत्तर देखील अपेक्षाभंग करणारे आहे.
पंचायतराज व्यवस्थेच्या अमलबजावणीमुळे खेडी स्वयंपूर्ण होतील, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिकांचा प्र��्यक्ष सहभाग असल्यामुळे यंत्रणेतील आर्थिक गैरव्यवहारांना पायबंद बसेल,असा अंदाज होता, तो सफल होऊ शकला नाही. हा या व्यवस्थेचा पराभवच मानावा लागेल.ग्रामसभेत विकासकामांना मंजुरी देणे, विकासकामांच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, इ. महत्वाची कामे होणे, अपेक्षित असते. पण तसे घडत नाही. कारण नोकरशाही व सरपंच/उपसरपंच यांच्यामध्ये झालेली अभद्र युती त्यास कारणीभूत ठरली आहे.
आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व काळात पंचायतराज व्यवस्थेचा पाया घालण्यात आला.लॉर्ड रिपन या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या.१४१ वर्षांपूर्वी १२ मे १८८२ रोजी हा ऐतिहासिक निर्णय अंमलात आला.राजस्थान हे पंचायतराज व्यवस्था स्विकारणारे पहिले राज्य ठरले.या राज्याने २ ऑक्टो.१९५९ ही व्यवस्था स्विकारली.या व्यवस्थेनुसार गाव ( ग्रामपंचायत ) तालुका ( पंचायत समिती ) जिल्हा ( जिल्हा परिषद ) अशी रचना निर्माण झाली.या माध्यमातून महात्मा यांचे " स्वप्नातील समृद्ध खेडे," साकार करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल ठरले.
" ग्रामीण भागाच्या विकासात लोकांचा सहभाग," असा उद्दात हेतू या व्यवस्थेमागे होता.पण सुमारे दीडशे वर्षांच्या वाटचालीनंतर तो किती सफल झाला,त्यामध्ये कसकसे बदल झाले.दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी या व्यवस्थेला सर्वाधिक प्राधान्य दिले,याबाबत परामर्श घेणे,क्रमप्राप्त ठरते.ही व्यवस्था अधिक भक्कम व्हावी,यासाठी त्यांच्या काळात घटनादुरुस्ती करण्यात आली.या निर्णयानुसार " विकासात लोकसहभाग," ही संकल्पना जन्माला आली.गावातील विकासकामे करण्याचा अधिकार ग्रामसभांना देण्यात आला.ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाच्या ताळेबंदला मंजुरी देण्याचा अधिकारही ग्रामसभांना मिळाला.त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर एकप्रकारे वचक निर्माण झाला.आज विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीना वर्षाकाठी लाखो रु.निधी देण्यात येतो,हे पंचायतराज व्यवस्थेचे फलित आहे.पण अमलबजावणी प्रक्रियेत मात्र सर्वत्र सावळागोंधळ आहे.
लोकशाही व्यवस्थेत विकेंद्रीकरण व लोकसहभाग वाढावा, यासाठी सरकारने ७३ वी घटनादुरुस्ती केली.या घटनेस आता तीन दशके उलटून गेली.२४ एप्रिल १९९३ रोजी यामधील बदलाच्या कार्यवाहीला सुरुवात झाली.ग्रामसभेला व्यापक अधिकार मिळाले, व ग्रामीण भागाची वाटचाल ही स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने सुरू झाली.ग्रामसभेमुळे लोकांना आपल्या गावाच्या विकासाची दिशा समजू शकली.विशेष बाब म्हणजे महिलांचा सहभागही वाढत गेला.सरपंच,उपसरपंच,
जिल्हा परिषद अध्यक्ष,पंचायत समिती सभापती इ.महत्वाच्या पदावर महिला विराजमान होऊ शकल्या.पंचायतराज व्यवस्थेचे हे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.या घटनादुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक अधिष्ठान मिळाले.या संस्थांना २९ विकासकामे सर्वसंमतीने करण्याचे अधिकार मिळाले.त्यामध्ये आरोग्य,स्वच्छता,कुटुंब कल्याण,महिला व बालविकास,समाजकल्याण,गुरांचा चारा,रस्ते,होडीवाहतूक,
ग्रामीण विद्युतीकरण,अपारंपरिक ऊर्जा,दारिद्र्य निर्मूलन,सार्व.संपत्तीची जपणूक,पशुपालन,जमीन सुधारणा,पाणी व्यवस्थापन,दुग्धव्यवसाय,सामाजिक वनीकरण,ग्रामीण घरबांधणी,वनशेती,तांत्रिक प्रशिक्षण व व्यवसाय मार्गदर्शन व सार्व.वितरण व्यवस्था इ.कामाचा समावेश आहे.
ही व्यवस्था आपण स्विकारली असली तरी ग्रामविकास व स्वयंपूर्ण खेडी,या दोन विषयी आपण फारसे यश मिळवू शकलो नाही.शहरीलगत असलेल्या भागात विकासाची गंगा पोहोचली, पण अतिग्रामीण भागातील आदिवासी गांवे व पाडे आजही विकासापासून वंचित आहेत.या ज्वलंत समस्येच्या मुळाशी जाऊन वेध घ���ण्याचा प्रयत्न आजवर एकाही सरकारने केला नाही.अनेक आदिवासी जिल्ह्यातील पाड्यापाड्यावर आजही कुपोषणाचे थैमान सुरूच आहे,बाल व गरोदर महिलांचे सतत होणारे मृत्यू थांबण्याचे नाव घेत नाही,महिलांची पाण्यासाठी वणवण सुरूच आहे.जिल्हा परिषदेच्या एकामागोमाग बंद पडत आहेत,प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था,इ.समस्या पंचायतराज व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.
आपल्या राज्यात प्रत्येक जिल्ह्याला विकासकामांसाठी प्रचंड प्रमाणात निधी मिळत असतो.आदिवासी जिल्ह्याचा दर्जा आलेल्या जिल्ह्यांना सर्वाधिक निधी देण्यात येत असतो.पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून अधिकार असूनही आज खेडी विकासापासून वंचित का आहेत ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.शिक्षणाचा अधिकार मिळूनही निरक्षरतेचे प्रमाण वाढत का नाही ? शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या चढत्या भाजणीवर का आहे ? यास कारणीभूत आहे ती सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी व नोकरशाही या दोघांची बुरसटलेली मानसिकता होय.ज्या पंचायतराज व्यवस्थेने ग्रामसभांना व्यापक अधिकार मिळाले,आज त्या ग्रामसभा कशा घेतल्या जातात,हे सांगायला नको.तीन दशके उलटल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने याविषयी कडक कायदे करणे,आवश्यक ठरते.पालघर जिल्ह्यासाठी नुकताच ४६८ कोटी रु.चा आराखडा मंजूर झाला असून तो राज्यशासनास सादर करण्यात आला आहे.प्रचंड प्रमाणात निधी मिळूनही पालघर जिल्हा हा मागासलेलाच आहे.मंत्रालयापासून अवघ्या १०० किमी अंतरावर असलेल्या जिल्ह्यात पाणी,आरोग्य,शिक्षण,
रोजगार,इ.प्रश्न " जैसे थे," आहेत.ग्रामसभा अधिक बळकट करण्याच्या दिशेने प्रयत्न होणे गरजेचे आहे.पण दुर्देवाने सरकारच अनेक विषयी ग्रामसभेला महत्व देत नाही.ग्रामीण भागात विकास प्रकल्प राबवताना मायबाप
सरकारच ग्रामसभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावाना केराची टोपली दाखवते.डहाणू-वाढवण येथे प्रस्तावित असलेल्या महाकाय बंदरासंदर्भात केंद्र व राज्यसरकार सुमारे २० ते २२ गावाच्या ग्रामसभात मंजूर झालेल्या ठरावाना काडीची किंमत देत नाही.
ग्रामीण भागाचा विकासाच्या बाबतीत कायापालट करायचा झाल्यास सरकारने
पंचायतराज व्यवस्था अधिक बळकट करणे,आवश्यक आहे.त्यासाठी झारीतील शुक्राचार्यांना वठणीवर आणावे लागेल व कायदे अधिक कडक करावे लागतील.पण सरकार त्यादृष्टीने पावले उचलेल, असे वाटत नाही.कारण ग्रामीण भागात प्रकल्प राबवताना दस्तुरखुद्द सरकारलाच ग्रामसभा आता अडचणीच्या ठरू लागल्या आहेत." हमारा गाव,हमारा ��िकास," ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता नाही.
0 notes
लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता, समन्वयवादी वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकाला स्मृति दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली..!
अभिवादनकर्ते :- 🚩🚩 महाराष्ट्र आर्यन सेना 🚩🚩
#laalbahadurshastri ... @nasa
1 note
·
View note
शिर्डी-अहमदनगरच्या विकासात समृद्धी आणणारा महामार्ग!
शिर्डी-अहमदनगरच्या विकासात समृद्धी आणणारा महामार्ग!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी १० किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गालगत…
View On WordPress
0 notes